Tuesday, 2 April 2013

समाजात असलेले जातीचे कोंदण...



समाजात असलेले जातीचे कोंदण




             खरे तर आज भारत स्वतंत्र होऊन ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यावरपण आपल्याला या विषयावर चर्चा करण्याची वेळ यावी हे खरे तर आपले दुर्दैव आहे असे मला वाटते, पण खरेच जातीच्या पल्याड व्यवस्था निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत का ?


महासत्तेच्या गप्पा जेव्हा आपण मारत असतो तेव्हा एकीकडे राजकारणी लोक (राजकारणीच कशाला आपण सुद्धा) ब्राम्हण, मराठा, इ वर आपआपले लौबिंग करत असतात किती हि विसंगती? कि आपणच आपल्या डोळ्यावर लावलेली झापड असते हि ?
                    जातीवर आधारित आरक्षणामुळे तर थोड्या दिवसाने अर्थव्यवस्थेला आणि देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण व्हायची शक्यता मला दिसत आहे (का कोण जाणे भारताचा युरोप होईल असे मला उगाच वाटत असते) {विभाजनाच्या बाबात} कारण आज मराठे आरक्षण मागत आहेत उदयाला ब्राम्हण मागतील मग दर्जावर आधारित निवडीच्या ऐवजी हा त्या जातीचा म्हणून निवड होणार आणि पुढे तो माणूस जे काम करणार आहे त्याच्या दर्जाबाबत न बोललेलेच बरे.
                     अजुन एक महत्वाचे निरीक्षण असे कि आज एका विशिष्ठ वर्गाला सातत्त्याने लक्ष्य करण्यात येत आहे (त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या चुकानसाठी) अत्यंत हीन पातळीवर त्या वर्गाची अब्रू काढण्यात येत आहे आणि ते हि इतिहासात झालेल्या चुका उगाळून. आणि हे इतक्या पद्धतशीरपणे चालू आहे कि यातून रामदास स्वामी, वीर सावरक, पु ल देशपांडे, लो.टिळक, आचार्य अत्रे इ. थोर माणसे सुद्धा सुटली नाहीत अर्थात त्या तथाकथित वर्गाकडूनही या आगीत काही प्रमाणात तेल ओतले जात आहे हेही तितकेच खरे आहे आणि हे सर्व सत्तेसाठी आणि राजकारणासाठी चालू आहे हेही सांगणे न लागे.
                       कालच मी वाचले कि श्री प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली आहे कि शाळेत नाव घालताना जातीचा कौलम नसावा किती मस्त आहे न हा उपाय कारण नकळत्या वयात आपणच आपल्या मुलांना तू ब्राम्हण, तो बौध्ह हा मराठा बरका असे सांगतो आणि विभाजनाचे, दुराव्याचे बीज रोवत असतो. मग जर सुरवातीलाच जातीची भिंत नसेल तर ती पुढे पण आडवी येणार नाही पण त्यासाठी मात्र खूप प्रयत्न करावे लागतील कारण सत्तेचे आणि धर्माचे दलाल असे सहज करू देतील असे नाही.
                     हरियाना, राजस्थान इ राज्यात तर जातीबाहेर लग्न केलेल्या तरुण-तरुणींची अमानुष पध्दतीने मुस्कटदाबी केली जाते. जातीचा इतका जबरदस्त पगडा तिथे जाणवतो कि कायदा तिथे अस्तित्वात आहे कि नाही असेच वाटू लागते.
या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे जात पात न मानता माणसाच्या गुणवत्तेवर त्या माणसाची पारख करायला शिकले पाहिजे मग भले तो कुठल्या का जातीचा असो.
आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना आधार द्यायचे काम करता आले तर ते सुद्धा एक मोठे यश म्हणता येईल आपल्याला.
अवांतर :- हा धागा काढण्याचा उद्देश जुन्या गोष्टी उगाळण्याचा अथवा एकमेकांना दुषणे देण्यासाठी काढलेला नाही तर सध्या असलेल्या जातीपातीला हटवण्यासाठी काय करता येईल या विषयी काढलेला आहे तरीही कृपया कुणाही जातीबद्दल अथवा व्यक्ती बद्दल इथे वादग्रस्त विधाने करू नयेत जेणेकरून आपल्याला आपसात होणारे वाद टाळून विषयाला न्याय देता येऊ शकेल.
उपेक्षित***

2 comments:

  1. sir plz tumcha email address dya kinva tumchi mala emal karu shakta maajhya email address var... plz plz plz sir... kahi mahatvach bolaych aahe... rutekar486@gmail.com

    ReplyDelete
  2. नमस्कार राहुल,

    माझा मेल आयडी - gajanan59@gmail.com आहे.

    ReplyDelete